जळगाव मिरर | ६ सप्टेंबर २०२३
प्रत्येक व्यक्तीला रेल्वेचा प्रवास सुखकर मानला जात असतो पण गेल्या काही वर्षापासून हा प्रवास मोठा त्रासदायक वाटू लागला आहे. अनेक महिलांना छेडखानीचे प्रकार रेल्वेत घडत असल्याचे बाहेर येवू लागले आहे. तर अनेक रेल्वेत जागेवरून प्रवाशात होणारे वाद व त्यातून होणारी हाणामारी हे तर सतत होत असतात. तर अनेक घटना स्टेशन बाहेर देखील छोट्या मोठ्या कारणाने घडत असतात.
अशीच एक घटना डोंबिवली स्टेशन बाहेर पुन्हा एकदा फेरीवाले बसायाला सुरवात झाली आहे. रेल्वे स्टेशनपासून 150 मीटर परिसरात फेरीवाले बसू देऊ नये, असा कोर्टाचा आदेश असून सुद्धा महापालिका प्रशासन लक्ष देत नाही. यामुळे फेरीवाल्यांमध्ये कोणत्याही प्रकारची भीती नाही. ते खुलेआम स्टेशन परिसरात ग्राहकासोबत दबंगगिरी करतात. त्यांच्या दादागिरीचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समोर येत आहे.
विशेष म्हणजे आता तक चक्क रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यासमोरच भर रस्त्यात दोन फेरीवाले महिलांमध्ये फ्री स्टाईलने हाणामारी झाली. तब्बल 25 मिनिटे हा तमाशा स्टेशन परिसरात सुरू होता. अखेर नागरिकांनी मध्यस्थी करत हे प्रकरण सोडवले. तरी पालिका प्रशासन आणि पोलीस कधी लक्ष देणार? असा सवाल आता नागरिक करु लागेल आहेत.
कल्याण आणि डोंबिवली शहरांमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालीय. रोज काहीना काही घटना घडत असते. डोंबिवलीत फेरीवाल्यांच्या दादागिरीचा तर कधी एखाद्या रिक्षावाल्याच्या दादागिरीचा प्रकार सातत्याने समोर येत असतो. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. याबाबत पोलिसांनी काहीतरी ठोस पाऊल उचलणं महत्त्वाचं असल्याचं मत नागरिकांचं आहे