
यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात राहणारी १ वर्षाच्या चिमुकलीच्या अंगावर गरम पाणी पडल्याने ती गंभीर भाजली गेली होती. तिच्यावर १२ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. यावल तालुक्यात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुकयातील मालोद येथे राहणाऱ्या आरती भील ही चिमुकली आपल्या आईवडीलांसह वास्तव्याला आहे. आईवडील हे शेतात मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. २१ एप्रिल रोजी सकाळी घरात चुलीवर अंघोळीसाठी पाणी तपाविण्यासाठी ठेवले होते. त्यावेळी चिमुकली खेळत असतांना अचानक चुलीवरील भांड्यातील गरम पाणी खाली पडल्याने बाजूला असलेली आरती ही गंभीररित्या भाजली गेली होती. तिला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. हि चिमुकली १२ दिवसांपासून मृत्यूशी असलेली झुंज आज अखेर संपली. सोमवारी २ मे रोजी रात्री ११.३० वाजता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून झीरो नंबरने यावल पोलीसात नोंद वर्ग करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.