
जळगाव : प्रतिनिधी
गेल्या तीन वर्षात पक्षाचा एक वेळा झेंडा तीन वेळा पक्षाची भूमिका बदलविणारे राज ठाकरे यांना आता एजंट म्हणून काम करावे लागत आहे. कुठेच सहारा मिळत नसल्याने ते भाजपचा हवाला घेऊन काम करत आहे. ते सध्या भोग्यांचा सहारा घेऊन काम करत आहे त्यांनी यापुढेही भोग्यांचा मुद्दा घेऊन काम करावे अशी टीका शिवसेनेचे नेते ना. गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
मनसे अध्यक्ष ठाकरे गेल्या गुढीपाडवा मेळाव्यात भोंगे हटविण्याची भूमिका घेतली होती. राज्य सरकारला देखील 3 मे पर्यंत मुदत दिली आहे. व उद्या संभाजीनगर येथे राज सभा घेत आहेत ते उद्या सभेत काय बोलतील याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागून आहे.