जळगाव : प्रतिनिधी
शिंदे सरकार आल्यापासून राज्यातील सर्वच विरोधी नेते या सरकारवर तुटून पडले आहे कि, हे सरकार पडणार…शिंदे गट आणि शिंदे सरकारशी संबंधित प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात असल्याने शिंदे सरकारवर टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते एकनाथ खडसे यांनी मत व्यक्त केले आहे. यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकरणांमध्ये राज्यघटनेतील तरतुदीनुसार दिलेले निर्णय पाहता हे सरकार कोसळू शकते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केल आहे.
जळगाव जिल्हा दूध संघावर गैरवालाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. तर दुसरीकडे या दूध संघावर प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. याबाबत माहिती देण्यासाठी जळगावतील निवासस्थानी एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी एकनाथराव खडसे यांनी शिंदे सरकारवर गंभीर आरोप केले.
एकनाथ खडसे म्हणाले की, ‘ या संदर्भात येत्या १ तारखेला निर्णय आहेत. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिका दाखल झालेल्या आहेत. घटनेच्या १० व्या परिशिष्टातील तरतुदींनुसार या पूर्वी अशाच प्रकरणांवर निर्णय झालेले आहेत. हे सरकार राहील की नाही राहणार याबाबत शंका आहे. हे सरकार कोसळू शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हे सरकार बरखास्त होऊ शकते. तर, दुसऱ्या बाजूला राज्यात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यात १६ आमदारांच्या पात्रतेचा मुद्दाही महत्वाचा आहे. त्या १६ आमदारांना एकतर गट स्थापन करून कोणत्यतरी पक्षात जावे लागेल, नाहीतर ते अपात्र ठरू शकतात.




















