शेंदुर्णी ता.जामनेर : प्रतिनिधी
जळगांव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या संकल्पनेतुन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आज सामाजिक ऐक्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. आज शेंदुर्णीत स्वाक्षरी मोहिमेत शेंदुर्णीकरांनी उदंड प्रतिसाद देत आपल्या गावातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याचा संकल्प यावेळी केला.
सकाळी नगराध्यक्षा विजया खलसे यांचे पती व पं.दिनदयाल उपाध्याय पतसंस्थेचे चेअरमन अमृत खलसे यांनी प्रथम गावकऱ्यांच्या वतीने स्वाक्षरी करुन या अभियानास प्रारंभ केला. यावेळी पहुरचे पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले तसेच या उपक्रमाचा उद्देश विषद केला.
पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे यांनीही आपल्या भेटीत या अभियानात सर्वांनी सहभागी होऊन आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत जातीय,धार्मिक व सामाजिक ऐक्य कायम ठेवण्यासाठी आपले कर्तव्याची जाणीव ठेऊन काम करण्याचे आवाहन केले. सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत शहरातील तीन मध्यवर्ती ठिकाणी स्वाक्षरी मोहिम मोठे बँनर लाऊन राबविण्यात आली. राष्ट्रवादी पक्षाचे नेते व शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय गरुड यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
भाजपचे जेष्ठ उत्तमराव थोरात, शेंदुर्णी शिक्षण संस्थेचे सचिव सतिषचंद्र काशिद, संचालिका उज्वला काशिद, माजी सरपंच सागरमल जैन, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, शेंदुर्णीचे उपनगराध्यक्ष निलेश थोरात, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी, तलाठी नाईक, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विजयानंद कुलकर्णी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय सुर्यवंशी, राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन गरुड, भाजपचे शहराध्यक्ष डॉ. पंकज सुर्यवंशी, प्रविण गरुड जेष्ठ नेते पंडितराव जोहरे, शांताराम गुजर, सुनील शिनकर , सुनील गुजर, जावा शेठ, पिंटु काझी, प्राचार्य डॉ. व्ही.आर.पाटील, मुख्याध्यापक संजय उदार, राजेंद्र गुजर, प्रमोद खलसे, भक्ती कुलकर्णी, नामदेव बारी, प्रकाश झंवर, मौलाना आझाद पतसंस्थेचे चेअरमन शेख हुसेन, पोउनि. संजय बनसोडे, दिलीप पाटील, संदिप चेडे, अमोल गर्जे, पत्रकार संघाचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, विविध धर्मीय नागरिक, व्यापारी, शेतकरी, शेतमजुर, विद्यार्थी, राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, प्रवासी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, शांतता समितीचे पदाधिकारी, विविध गणेशोत्सव, दुर्गोत्सव मंडळांचे पदाधिकारी मराठी, उर्दु शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांनी आपला सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी केला.
