जळगाव मिरर / ५ एप्रिल २०२३ ।
गेल्या काही वर्षापासून प्रेम प्रकरण इतके बहरू लागले आहे कि त्या प्रेमाच्या मर्यादा ओलांडताना अनेक प्रियकर व प्रेयसी दिसून येत आहे. अशीच एक संतापजनक घटना जिल्ह्यात घडली आहे. यामुळे एकच चर्चेला उधान आले आहे. हि घटना बोदवड तालुक्यातील एका गावात घडली आहे.
लग्नात सप्तपदी घेत सात जन्माची गाठ बांधली. मात्र, ही गाठ सैल झाली आणि सात वर्षांनी विवाहितेने नवऱ्याला सोडत प्रियकराचा हात धरला. बोदवड तालुक्यातील एका गावातील माहेर असलेल्या विवाहितेने हा प्रकार केला आहे. त्या प्रकरणात तिच्या भावानेच पोलिसात ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली, तर अन्य शहरातील तीस वर्षांची विवाहिता प्रियकरासोबत निघून गेली आहे.
तालुक्यातील एका गावात २७ वर्षांच्या विवाहितेचे माहेर आहे. ती माहेरी आली होती. त्याच काळात सातत्याने गावात येत असलेल्या एका तरुणासोबत तिचे सूत जुळले. तिने कुठलाही विचार न करता त्याच्यासोबत जाणे पसंत केले. माहेरी आली असताना ती घरी नाही, हे पाहून तिच्या भावाने शोधाशोध केली. मात्र, तरीही ती सापडली नाही. अखेर तिच्या भावाने पोलिसात तक्रार दिली. पुढील तपास संदीप वानखेडे हे करत आहेत.तर अन्य एका घटनेत शहरातील ३० वर्षीय महिलेने मुलांचा विचार न करता प्रियकराचा हात धरला आहे.