जळगाव मिरर | २४ ऑगस्ट २०२६
शहरातील बालाजी पेठेतून दुचाकी चोरणाऱ्या शेख ईरफान शेख रईस (रा. एरंडोल) या चोरट्याच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरुन शनिपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडन चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

मिळलेल्या माहितीनुसार, शहरातील बालाजी पेठेतून निलेश प्रकाश बोरसे (वय २७) यांची दि. १३ ऑगस्ट रोजी चोरट्यांनी दुचाकी चोरुन नेली होती. बाहेरगावाहून परतल्यानंतर ही घटना दि. १८ ऑगस्ट रोजी उघडकीस आल्यानंतर शनिपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी गुन्हे शोध पथकाला हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपनिरीक्षक संतोष खेडकर, परि. उपनिरीक्षक अभिषेक कटारे, पोहेकॉ विजय खैरे, योगेश जाधव, पराग दुसाने, अमोल वंजारी, निलेश घुगे गणेश ढाकणे, योगेश साबळे यांचे पथक रवाना केले होते.
गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक संतोष खेडकर यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर चोरट्याचा शोध सुरु केला. संशयित चोरटा हा एरंडोल येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने बस स्टॅण्ड परिसरातून त्याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केलयानंतर त्याने चोरलेल्या तीन दुचाकी काढून दिल्या असून पोलिसांनी त्या जप्त केला आहे.




















