
जळगाव मिरर | २४ ऑगस्ट २०२५
सर्जा-राजाला गावात फिरवून पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला. त्यानंतर रात्री गच्चीवर गेलेल्या ऋषीकेश विजय न्हावी (वय २३, रा. ममुराबाद, ता. जळगाव) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील ऋषिकेश न्हावी हा कुटुंबियांसह वास्तव्यास होता. शुक्रवारी दिवसभर त्याने गावात सर्जा-राजाला फिरवून पोळा साजरा केला. त्यानंतर रात्री घरी गेल्यानंतर रागाच्या भरात तो गच्चीवर गेला आणि तेथे गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. तो रागात गच्चीवर गेल्याने त्याच्या पाठोपाठ घरातील सदस्यही गेले. तरुणाने गळफास घेतल्याचे दिसताच त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रकाश चिंचोरे करीत आह.




















