
धरणगाव : विनोद रोकडे
धरणगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे चा आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन यांनी धरणगाव शहरांतील पाणीपुरवठा आरोग्य लाईट शेतकऱ्यांचा समस्या यावर भर दिला त्यानी पाणीपुरवठा मंत्री असून सुद्धा शहराला 20 दिवसांत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागरिकांचा आरोग्य शी खेळ खेळला जात आहे धरणगाव शहरातील विकास शून्य असून ठेकेदार यांचे पोसण्यासाठी शासनाच्या निधी वापर करण्यात येत आहे तसेच धरणगाव उपजिल्हा रुग्णालय व डॉक्टरची रिक्त पदे कधी भरणार असा सवाल त्यानी केला धरणगाव शहरात पाईपलाईन खोदलेल्या रस्ते नियोजन नाही कधी पाईप उपलब्ध राहत नाही तर खड्डे खोदले का जातात असा प्रश्न उपस्थित केला तसेच तालुका अध्यक्ष धनराज माळी यांनी ग्रामीण भागातील शेतकरी त्रस्त आहे मोठं मोठ्या वल्गना करत आहेत शेतकऱ्यांना पाटाचे पाणी मिळत नाही पाटचऱ्या दुरुस्ती नाही नोव्हेंबर मध्ये पाटला पाणी सोडण्यात यावे, तसेच संजय निराधारची मिटींग गेले आठ महिन्यापासून झाली नाही यामुळे गरीब गरजू नागरिक या योजने पासून वंचित असल्या चा आरोप केला तसेच शहर अध्यक्ष निलेश चौधरी यांनी नगरपालिका प्रशासनचा समाचार घेतला यावेळी त्यानी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी केले विकास दाखवा एक ठोस काम दाखवा आणि लाख रुपये मिळावा असे आव्हान पालकमंत्री यांना केले धरणगाव शहराला वेठीस धरले तसेच नगरपालिका येथे पाणीपुरवठा इंजिनियर व तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले ची माहिती दिली.
राष्ट्रवादी चे नेते ज्ञानेश्वर नाना महाजन, मोहन नाना पाटील,जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे,ता कार्याध्यक्ष अरविंद देवरे,तालुका अध्यक्ष धनराज माळी, शहर अध्यक्ष निलेश चौधरी, यु ता अध्यक्ष मनोज पाटील, यु श अध्यक्ष संभाजी कंखरे, सो मि प्रमुख सागर वाजपेयी, सीताराम मराठे,सुमित मराठे, नारायण चौधरी,भूपेंद्र पाटील,दिनेश भदाणे, अजय महाजन आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तित होते.




















