जळगाव मिरर । १५ ऑक्टोबर २०२२
राज्यात दोन वर्ष कोरोनाचे थैमान असतांना राज्य सरकारने पोलीस भरती स्थगित केली होती. त्यातील काही तरुणाचे वय वाढ झाल्याने त्यांना आता येणाऱ्या पोलीस भरतीत सहभागी होता येत नसल्यामुळे राज्य सरकारने याचा विचार करीत येणाऱ्या पोलीस भरतीत वय वाढवून देण्याची मागणी जळगावात आज मंत्री गिरीश महाजन यांना पोलिस बॉईज संघटनेने निवेदन दिले आहे.
काय आहे निवेदन
सन 2019 पासून महामारीमुळे महाराष्ट्र पोलिस दलात कोणत्याही प्रकार भरती प्रक्रीया राबवण्यात आलेली नसुन भरती प्रक्रीयेत होत असलेल्या दिरंगाई मुळे पोलिस दलाचे स्वप्न बघणाऱ्या अनेक युवकांची स्वप्न अपूर्ण राहीलेलो आहेत. भरती प्रक्रीयेत होत असलेल्या दिरंगाईमुळे बऱ्याच मुलांची वयोमर्यादा संपली असल्याने पोलीस दलाची स्वप्न बघणान्या युवकांना त्यांच्या स्वप्नांपासून वंचीत रहावे लागले आहे. महामारीमुळे भरती प्रक्रीया घेता येत नसल्याने मागील सरकारने वाढीव वयाबाबत आदेश देखील निर्गमीत केलेले -असून आगामी काळात होत असलेल्या पोलिस भरती प्रक्रीयेत वयोमर्यादा पूर्ण करुन भरती प्रक्रीयेतून बाद झालेल्या युवकांना वाढीव बयाचे अतिम संधी देवून भरती प्रक्रीयेत सहभागी करून घेण्यात यावे.