
जळगाव मिरर / १८ ऑक्टोबर २०२२
राज्यातील शिंदे व फडणवीस सरकार दिवाळीच्या दिवसामध्ये विविध बोनस व पगार सरकारी कर्मचाऱ्याचे करीत आहे. तर जनतेसाठी १०० रुपयात दिवाळीची योजना शिंदे सरकारने आणली होती. ती मात्र अद्यापही सुरु झालेली नाही अवघ्या काही दिवसावर दिवाळी येऊन ठेपली आहे. या घोषणेचा सरकारला विसर पडलेला दिसत आहे. पण विरोधी पक्षासह जून रेशन दुकानांमध्ये पोहचलंच नसल्याचा आरोप केलाय.
राज्य सरकारने दिवाळीच्या मुहूर्तावर शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत दिवाळी कीट देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या 100 रुपयांच्या किटमध्ये प्रत्येकी 1 किलो रवा, शेंगदाणे, खाद्यतेल आणि पिवळी मसूर डाळ देण्यात येणार होता. मात्र रेशन धारकांना अजूनही हे कीट मिळालेलं नाही. गरिबांची दिवाळी गोड करण्याची केवळ घोषणाच आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केलीय. तर मनसेनंही हे किट अजून रेशन दुकानांमध्ये पोहचलंच नसल्याचा आरोप केलाय. तसंच टेंडरमध्ये घोळ असल्याचा आरोपही मसने नेते संदीप देशपांडेंनी केलाय.




















