
जळगाव मिरर । १ नोव्हेबर २०२२
निसर्गाचा व पर्यावरणाचा समतोल राखण्याची नितांत गरज आहे असे मागील दोन वर्षातील कोरोनाच्या काळामध्ये मानवाला प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे. म्हणूनच आज मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राज्य आदर्श सरपंच – श्री भास्करराव पेरे पाटील यांनी शिर्डी येथील तीन दिवसीय पर्यावरण संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
शिर्डी येथे निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाचे सहावे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डी येथील साई आश्रम भक्त निवास येथे संपन्न झालेल्या उद्घाटन प्रसंगी श्री भास्करराव पेरे पाटील यांनी केले. इवलेसे रोप लावियेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. या संतांच्या उक्तीप्रमाणे स्वर्गीय आबासाहेब मोरे यांनी 40 वर्षांपूर्वी निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाची स्थापना करून ध्येयवेड्या प्रमाणे अनेक वृक्षांची लागवड करून राज्यातील अनेक पर्यावरण प्रेमींना एकत्रित करून आदर्शव्रत कार्य केले, म्हणूनच त्यांना वृक्षमित्र पुरस्कार महामहीम राष्ट्रपती पदकाने सन्मानित केले गेले म्हणून यांना एकदा मनापासून वंदन करतो. पर्यावरण प्रदूषण निवारण हा काही राजकीय विषय नाही, एका संस्थेचा विषय नाही तसेच हा एका माणसाचा विषय नाही, एका जातीचा विषय नाही, तर हा विशाल दृष्टीकोनातून आखील मानवाच्या कल्याणासाठीच व उद्धाराकरिता असलेला विषय आहे. आणि तो अतिशय गरजेचा झालेला विषय आहे. असे मला वाटते ,आम्ही याच्यावरच काम करतोय इतर अनेक गोष्टीवर काम करतोय, आमच्या गावात आम्ही जे काही केलंय इतर ठिकाणी जाऊन सांगतो . लोक आमच्या ऐकतील किंवा त्यांनी ऐकावे असा आमचा दावा नाही पण आम्ही जातो व सांगतो. मी आजवर 7000 खेड्यात आतापर्यंत गेलो, 15 लाख किलोमीटर प्रवास झाला, हे अंतर 66लाख 15 हजार किलोमीटर म्हणजे साधे काम नाही , रोज 300 ते 400 किलोमीटर पण आम्ही जातो, आम्हाला भारताचे माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम साहेबांनी जी शपथ दिली होती की तुम्ही इतर गावात जा, लोकांना विनंती करा लोकांच्या पाय पडा, आम्ही त्या शपथीप्रमाणे वागतो ,पर्यावरण विकासरत्न त्यावेळच्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पुरस्कार आम्हाला मिळाला होता. या उद्घाटन प्रसंगी साई संस्थानच्या कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानाईत मॅडम ,अहमदनगर जिल्हा उपवनसंरक्षक अधिकारी श्रीमती सुवर्णा माने मॅडम , मंडळाचे राज्य सल्लागार व मार्गदर्शक श्री राज देशमुख ,अध्यक्ष श्री प्रमोद मोरे ,सचिव श्रीमती वनश्री मोरे श्रीमती प्रिया तांबोटकर ,राज्य कार्याध्यक्ष प्रमोद काकडे , उपाध्यक्ष श्री प्रकाश केदारी ,राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त अनिल लोखंडे, राज्य उपाध्यक्ष सौ मनिषा पाटील संघटक दिलीप धावणे, जिल्हा संपर्क प्रमुख विजय बोडखे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले तर या कार्यक्रमासाठी 28 जिल्ह्यातून सहकुटूंब व परिवारासह आलेले 500 ते 600 निसर्ग व पर्यावरण प्रेमी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. फोटो शिर्डी येथे निसर्ग व पर्यावरण मंडळाचे 6 वे संमेलन उद्घाटन प्रसंगी उपस्थित वृक्षप्रेमींना मार्गदर्शन करताना आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील दिसत असून प्रसंगी साई संस्थानच्या कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानाईत मॅडम ,अहमदनगर जिल्हा उपवनसंरक्षक अधिकारी श्रीमती सुवर्णा माने मॅडम , मंडळाचे राज्य सल्लागार व मार्गदर्शक श्री राज देशमुख ,अध्यक्ष श्री प्रमोद मोरे ,सचिव श्रीमती वनश्री मोरे श्रीमती प्रिया तांबोटकर ,राज्य कार्याध्यक्ष प्रमोद काकडे , राज्य उपाध्यक्ष सौ मनिषा पाटील उपस्थित होते




















