नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात रेल्वे म्हटली तर फक्त प्रवासी व मालवाहतूक जास्तीत जास्त ज्या राज्यात पाण्याची टंचाई असेल त्यावेळेस पाणी यापेक्षा जास्त सणासुदीचा काळ असेल किंवा काही खास कार्यक्रम असेल तर स्पेशल ट्रेन चालवल्या जातात. पण कधी डासांसाठी स्पेशल ट्रेन चालवल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? पण देशाच्या राजधानीत अशीच डासांसाठी खास स्पेशल ट्रेन चालवली जाते आहे. मॉस्क्विटो टर्मिनेटर ट्रेनला नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरून हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.
डास म्हणजे आजार पसरवण्यास कारक ठरतात. डासांमुळे डेंग्यू, चिकनगुनिया असे गंभीर आणि जीवघेणे आजार होतात. त्यामुळे डास आपल्या आसपास असावेत असं कुणालाच वाटत नाही. किंबहुना डासांच्या नायनाट करण्यासाठी प्रयत्न केले जातात. उपाय केले जातात. असं असताना डासांसाठी स्पेशल ट्रेन का बरं? डासांना नेमकं या ट्रेनमधून कुठे नेलं जाणार? या डासांचं काय केलं जाणार? असे एक ना दोन किती तरी प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर या ट्रेनमधून डासांची वाहतूक होणार नाही तर ही ट्रेन डासांचा खात्मा करणार आहे.
मच्छर मार टर्मिनेटर ट्रेन (मॉस्क्विटो टर्मिनेटर ट्रेन) को आज नई दिल्ली रेलवे स्टेशन से हरी झंडी दिखाकर रवाना किया गया। 6 सप्ताह में कुल 12 बार यह ट्रेन चलायी जाएगी मच्छर प्रजनन के मौसम में प्रत्येक सप्ताह मे दो बार कीटनाशकों का छिड़काव किया जाएगा। pic.twitter.com/vSS286CFX9
— DRM Delhi NR (@drm_dli) September 16, 2022
पावसाळा म्हटला की डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका. घरात आपण डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदाणी, कॉईल, क्रिम, लिक्विड याचा वापर करतो. प्रशासनामार्फत जागोजागी फवारणी केली जाते. पण दिल्लीत या डासांचा खात्मा करण्यासाठी ही स्पेशल ट्रेन चालवली जाते. डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया यापासून बचाव करण्यासाठी दरवर्षी ही ट्रेन चालवली जाते.
या ट्रेनला डबे नाहीत. तर त्यावर हायप्रेशर ट्रक आहेत. ज्यातून मॉस्क्विटो औषध स्प्रे होतं. ही ट्रेन ताशी 20 किमी वेगाने धावते. 6 आठवडे एकूण 12 वेळा ही ट्रेन चालवली जाईल. दोनदा या ट्रेनमार्फत कीटकनाशकांची फवारणी केली जाईल. रेल्वे रूळ, त्याच्या आसपास डासांची पैदास होऊ नये, हे याचं उद्दिष्ट आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, बऱ्याच ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर अस्वच्छ पाणी जमा होतं आणि तिथं डासांची पैदास होते. यामुळे डासांच्या अळ्याच नव्हे तर डासांचाही नायनाट होईल. रेल्वे रूळांजवळ झोपड्यांमध्ये राहणाऱ्यांसाठी हा दिलासा आहे.
