जळगाव मिरर । ३० डिसेंबर २०२२
राज्यात गेल्या तीन वर्षाआधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील सरकारने पोलीस भरतीवर स्थगिती आणली होती. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलात मागील तीन वर्षांपासून रखडलेली भरती प्रक्रिया गेल्या ९ डिसेंबरपासून सुरू झाली आहे.
महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. राज्यातील १४ हजार जागांसाठी तब्बल १८ लाख अर्ज आले आहेत. तर नाशिक ग्रामीण पोलीस दलातील १७९ जागांसाठी तब्बल एकवीस हजार अर्ज दाखल झाले आहेत. या उमेदवारांची मैदानी चाचणी येत्या २ जानेवारीपासून सुरू होत आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात मागील तीन वर्षांपासून रखडलेली भरती प्रक्रिया गेल्या ९ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. दुसरीकडे मनुष्यबळ कमी झाल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. भरती प्रक्रियेत ९ ते ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानंतर अर्जांसाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. नाशिक ग्रामीणमध्ये १६४ पोलिस शिपाई व १५ चालकांची पदे भरण्यात येत आहेत. त्यासाठी अर्ज पडताळणी पूर्ण झाली आहे. उमेदवारांची मैदानी चाचणी आडगाव येथील ग्रामीण पोलिसांच्या कवायत मैदानात होणार आहे. २ ते २० जानेवारीपर्यंत ही चाचणी होईल, असे अधीक्षक कार्यालयाने स्पष्ट केले. २ व ३ जानेवारीस चालकपदासाठी व त्यानंतर शिपाईपदासाठी चाचणी सुरु होईल. त्या संदर्भातले वेळापत्रक जाहीर झाले असून, उमेदवारांना कळवण्यात आले आहे.
