
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर शहरातील मध्यवर्ती भागात असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गार्डनचे काम संथ गतीने सुरु असल्याबाबत परिसरातील नागरिकांनी अमळनेर मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, शहरातील मध्यवर्ती परिसरात असलेले छत्रपती शिवाजी महाराज गार्डनचे नूतनीकरणाचे काम गेल्या एक वर्षापासून कासवगतीने सुरु असून हे गार्डन भग्नावस्थेत पडलेले आहे. यामुळे नागरिकांना गार्डनमध्ये फिरणाऱ्या नागरिकांना गैरसोय होत आहे. तरी ते हे काम तत्काळ पूर्ण करावे अन्यथा २६ जानेवारी २०२३ रोजी नागरिक आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनावर बिपीन पाटील, रघुनाथ पाटील, युवराज पाटील, शिवाजी पाटील, संगीता जैन, उज्वला शिरोडे, नितीनकुमार शहा, महेद्र पाटील, सोमचंद संदानशिव, हृदयनाथ मोरे, संजय शहा, सीमा शहा, सुजित पाटील, राजेद्र चौधरी, जयदीप राजपूत, चद्रकांत महाजन, सुनिता मोरे, सुनंदा सोनवणे, प्रेमकुमार शहा, महेश राजपूत, वर्षा शहा, संजय चव्हाण, मीनाताई आठवले, अर्चना आठवले यांच्यासह नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.





















