
जळगाव मिरर । ८ नोव्हेबर २०२२
राज्यात ‘हर हर महादेव’ या चित्रपटामध्ये दाखविलेला इतिहास चुकीचा आहे असे म्हणत ठीक ठीक चित्रपट बंद करण्यात आला त्याचेच पडसाद जळगावातहि उमटले आहे, आज दि ८ रोजी सकाळी शहरातील संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष तुषार सावंत यांच्या अध्यक्षतेखाली इतिहासाची चुकीची मांडणी करणारा चित्रपट हर हर महादेव याचे चित्रीकरण बंद करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांच्याच बद्दल दाखवण्यात आलेला चुकीचा इतिहास हा आम्ही खपवून घेणार नाही अशी तीव्र प्रतिक्रिया देत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थेट चित्रपट गृहावर चित्रपट विरोधात हातात भगवे ध्वज घेत मोर्चा काढून सिनेमागृहात सुरू असलेला चित्रपट हर हर महादेव हा बंद पडला व पुन्हा या चित्रपटाचे चित्रीकरण होऊ नये असा इशारा देखील संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आला आहे. यावेळी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तुषार सावंत, महानगराध्यक्ष संदीप पाटील, शहर प्रवक्ता कुंदन सूर्यवंशी,गोपाल पाटील, प्रमोद कुंभार, बाळू पाटील, अविनाश पाटील, संदीप मांडोळे, चेतन सानप, सागर कोळी, राहुल पाटील, सतीश लाठी मोर्चात सहभागी झाले होते.




















