
जळगाव मिरर | १८ जून २०२५
तालुक्यातील वराड खुर्द गावात तुम्ही शेताचा ताबा सोडा असे म्हटल्याचा राग आल्याने जगन लालसिंग राठोड (वय ५०, रा. सुभाषवाडी, ता. जळगाव) यांना बापलेकाने बेदम माराहण केली. तसेच त्यांच्या शालकाला डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. १२ रोजी घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील सुभाषवाडी येथे जगन लालसिंग राठोड हे वास्तव्यास आहे. त्यांचे वराड खुर्द शिवारात शेती असून दि. १२ रोजी दुपारच्या सुमारास त्यांची पत्नी, शालक, सासू-सासरे व मेहूणी व साडू हे त्यांचे शेत पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेतात पंडीत चव्हाण व त्यांचा मुलगा विकास चव्हाण हे उपस्थित होते. त्यांनी जगन यांना तुम्ही या शेतात कसे काय आले, कस काय शेत दाखविता असे बोलू लागले. त्यावेळी जगन राठोड यांनी त्यांना हे शेत माझे असून तुम्ही या शेताचा ताबा सोडा असे म्हटले. त्याचा राग आल्याने पंडीत चव्हाण व त्यांचा मुलगा विकास याने जगन राठोड व त्यांचे शालक संदीप चव्हाण यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. विकास चव्हाण याने त्याच्या हातातील कुऱ्हाडीने संदीप चव्हाण यांच्या डोक्यात मारुन तर जगन राठोड यांना काठीने बेदम मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी पंडीत मगन चव्हाण व विकास पंडीत चव्हाण (दोघ रा. सुभाषवाडी, ता. जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ समाधान टहाकळे हे करीत आहे.