
जळगाव मिरर / १६ ऑक्टोबर २०२२
धरणगाव तालुक्यातील पाणीटंचाई संदर्भात शिवसेनेने (ठाकरे गट) नुकताच पालिकेवर भव्य मोर्चा काढला होता. यावेळी पालकमंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. याच आरोपांना उत्तर देण्यासाठी आज शिंदे गटाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील, विनय भावे,विजय महाजन, वासू चौधरी, अभिजीत पाटील,संजय चौधरी, वाल्मीक पाटील,संतोष महाजन, भैय्याभाऊ महाजन, विलास महाजन, तौसिफ पटेल, बुट्या पाटील उपस्थित होते यावेळी गावातील विविध विषयांवर पप्पू भावे व माजी नगराध्यक्ष पी एम पाटील यांनी मत व्यक्त केले धरणगाव शहरातील पाणी समस्या ला प्रशासन चे नियोजन कोर्डमडले असल्याने मंत्र्यांना दोष देणे योग्य नाही. धरणगाव शहरात पाणी समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील कटिबद्ध आहे धावडा ते धरणगाव नविन पाईपलाईन साठी जल जीवन मिशन अंतर्गत 72 लाख मजुरी झाले आहे जेणेकरून लिकेज होणार नाही धावडा ते धरणगाव पाईपलाईन 20 वर्षपूवी जुनी असून तिला बद्दलवणे गरजेचे होते असे भावे यांनी सांगितले तसेच धावडा डोहात गाळ साचल्याने पाणीपुरवठा करण्यास अडचणीयेत आहे मा मंत्री यांनी समधीत आधिकर्यांची बैठक लावून सूचना केल्या असल्याची मत व्यक्त केले यावेळी उपस्थित नगराध्यक्ष पी.एम. पाटील, विनय भावे,विजय महाजन, वासू चौधरी, अभिजीत पाटील,संजय चौधरी, वाल्मीक पाटील,संतोष महाजन, भैय्याभाऊ महाजन, विलास महाजन, तौसिफ पटेल, बुट्या पाटील यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते




















