जळगाव मिरर | ८ मे २०२५
जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात असलेले खडकेचाळ येथे गेल्या अनेक दिवसापासून गटारी तुंबल्याचे चित्र दिसत आहे. या परिसरात महानगरपालिकेचे कुठलेही कर्मचारी गटारी साफ करण्यासाठी येत नसल्याची तक्रार नागरिक करू लागले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव शहरातील शिवाजीनगर दूध फेडरेशन मुख्य रस्त्यावर असलेल्या खडकेचाळ येथे गेल्या अनेक दिवसापासून गटारी तुंबल्याचे चित्र दिसू लागले आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांना याचा त्रास होऊ लागला आहे. परिसरात अनेक लहान मुलं असून त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची जळगाव शहर महानगरपालिका वाट बघते का असा प्रश्न परिसरातील नागरिक सध्या विचारू लागले आहे या परिसरात महानगरपालिकेचे कुठलेही कर्मचारी स्वच्छता करण्यास येत नसल्याची तक्रार वारंवार काही नागरिकांनी महानगरपालिकेत केल्यावर देखील महानगरपालिकेचे प्रशासन नागरिकांना उडवा-उडवीचे उत्तर देत आहे. नागरिकांच्या या आरोग्याच्या प्रश्नाकडे महानगरपालिका जर लक्ष देत नसेल तरी याकडे लक्ष कोणी द्यावं हा देखील प्रश्न सध्या नागरिकांच्या मनात येऊ लागला आहे.
