जळगाव मिरर | ९ मे २०२४
दोघ मुलांसह भाच्याला येवून घराकडे निघालेल्या आशासेविकाला ओव्हरटेक करीत असलेल्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार महिलेसह तिच्या दोन्ही चिमुकले जागीच ठार झाले होते, तर भाचा लक्ष्मण नाईक हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असतांनाच रात्री एक वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. अपघातातील चौघांचा मृत्यू झाल्यामुळे नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयता एकच आक्रोश केला. तसेच जो पर्यंत संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
सविस्तर वृत्त असे कि, रामदेववाडी येथील माहेर असलेल्या वच्छलाबाई सरदार चव्हाण या दोघ मुलांसह भाचा लक्ष्मण नाईक याला घेवून दुचाकीने शिरसोली येथे जात होत्या. दरम्यान, शिरसोलीकडून रामदेववाडीकडे जाणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करी जात असलेल्या भरधाव वेगाने जाणाऱ्या (एमएच १९, सीव्ही ६७६७) क्रमांकाच्या कारने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार वच्छलाबाईसह तिचा दोन वर्षाचा मुलगा सोमेश व सात वर्षाचा सोहम हे तिघ मायलेक जागीच ठार झाले होते. तर त्यांच्यासोबत असलेल्या त्यांचा भाचा लक्ष्मण नाईक हा गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान, मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास लक्ष्मणची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ बहिण असा परिवार आहे.
अपघातात तिघ मायलेक जागीच ठार झाल्यानंतर उपचार सुरु असतांना चौथ्याचा देखील मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी जो पर्यंत धडक देणाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.
तसेच त्यांनी जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृहात ठिय्या मांडल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पठार टेकडीजवळून पुढे गेल्यानंतर रामदेववाडीकडे जाणाऱ्या वळणावर रस्त्याच्या विरुद्धदिशेने जाणाऱ्या (एमएच १९, सीव्ही ६७६७) क्रमांकाच्या वाहनाने (एमएच १९, ईई ८९२५) क्रमांकाच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात चौघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यांविरुद्ध मयत वच्छलाबाई चव्हाण यांचा भावाने राजेश अलसिंग चव्हाण (वय ३३, रा. रामदेववाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वाहन चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.