
जळगाव मिरर । ४ नोव्हेबर २०२२
राज्यातील सत्ता संघर्ष वाद आता जळगाव जिल्ह्यात शिंदे गट व ठाकरे गटातील भांडण आता थेट पोलीस चौकीपर्यंत गेल्याने दोन्ही गट आता आक्रमक झाल्याने जिल्हा प्रशासनाने मुक्ताई नगरातील सभेसाठी ठाकरे गटाची व शिंदे गटाचीही परवानगी नाकारल्याने आता ठाकरे गटाच्या नेत्यांना मुक्ताईनगरात महाप्रबोधन यात्रा थांबवावी लागणार आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि शिंदे गटाचे मंत्री गुलबराव पाटील यांच्यात मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोप केले जात आहेत यानंतर पक्ष बुडवणार अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली आहे. अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा ही सध्या जळगाव येथे आहे, दरम्यान जळगावमध्ये अंधारे यांच्या सभेला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे, तर दुसरीकडे गुलाबराव पाटील यांनी अंधारे यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
सुषमा अंधारेंना राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्यासाठी पाठवलं आहे असा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेबद्दल बोलताना ते म्हणाले की, अशा लोकांची महाप्रबोधन यात्रा नसून, हे जे प्रॉडक्ट आलं आहे, ते राष्ट्रवादीचं प्रॉडक्ट आहे. त्याचप्रमाणे उरल्या-सुरलेल्या शिवसेनेचं नुकसान करण्यासाठी हे नवीन पार्सल राष्ट्रवादीकडून इकडं आलेलं आहे, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे. पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, मुक्ताईनगरला चंद्राकांत पाटील आणि माझी संध्याकाळी सात वाजता सभा होती आणि त्यांची देखील सभा होती. जिल्ह्यात १४४ कलम लागू आहे. तसेच ५० मिटरच्या आता दोघांना परवानगी असल्याने जिल्हाधिकारी आणि एसपींनी विनंती केली की आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आणि कायदा सुव्यवस्था सांभाळणं आपली जबाबदारी आहे. म्हणून आम्ही परवानगी नाकारत आहोत.




















