जळगाव मिरर | २२ ऑक्टोबर २०२४
राज्यात विधानसभा निवडणुकीचे दोन दिवसात सर्वच पक्षाचे उमेदवार दोन ते चार दिवसात अर्ज भरणार आहे तर चार दिवसांत आम्ही सगळे उमेदवार डिक्लेअर करू कोणत्या मतदारसंघात लढायचं? एससी, एसटीला कुठे पाठिंबा द्यायचा? हे आम्ही ठरवणार आहोत. जिथे आम्ही निवडणूक लढणार नाहीत तिथे कोणाला पाठिंबा द्यायचा हे आम्ही आगोदर बॉण्ड घेऊन ठरवणार आहोत.आमचं ठरलं आहे, यावेळी आम्ही लढणार आहोत, पाडणार आहोत आणि जिरवणार पण आहोत. राज्यातल्या कोणीच आम्हाला चर्चा केल्याशिवाय बॉण्ड द्यायचा नाही असे मनोज जरांगे पाटील पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
आम्ही काल बोलताना म्हटलो की सगळ्यांनी अर्ज भरून घ्या, पण सगळ्यांनी भरू नका.तालुक्याच्या ठिकाणी बैठक घ्या या बैठकीत दोन ते तीन जणांची निवडा करा आणि त्यांनीच अर्ज भरा. ज्या दिवशी एक नाव डिक्लेअर होईल त्यावेळेस बाकीच्यांनी अर्ज काढू घ्या, फक्त एक अर्ज ठेवा असे मनोज जरांगे पाटील सोमवारी सकाळी पत्रकारांचे संवाद साधताना म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की एसटी, एससी उमेदवार आपण देणार नाहीत. जे आमच्या मागण्यांबाबत सहमत आहेत त्यांच्याकडून बॉण्ड घ्यायचा. पण त्याचा उलटा खेळ झाला. बॉण्ड म्हटलं की कोणीही बॉण्ड देत आहेत. आम्हाला काय तुम्हाला खर्चात पाडायचे नाही. आम्ही तुमच्या मागण्याशी सहमत आहोत हे आधी आम्हाला विचारा आणि नंतर बॉण्ड द्या तुमच मेरीट देखील बघावं लागणार आहे. एका मतदारसंघातून पन्नास शंभर बॉण्ड आले तर उगाच खर्च. त्यामुळे बॉण्ड देण्यापूर्वी आम्हाला एकदा विचारा, जिथे आम्ही लढणार नाही तिथला हा विषय आहे. अंतरवालीकडे चार दिवस कोणीही येऊ नका. फोटो काढण्यासाठी फक्त इकडे येऊ नका. मला आता ३५ दिवस मोकळ सोडा असेही यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले.
एससी, एसटी कोणत्याही पक्षाचा असो ज्यांना आमची मागणी मान्य आहे त्यांनी बॉण्ड द्यायचा. जर बॉण्ड आला नाही तर आम्ही अपक्ष उमेदवार उभा करू. जर ओबीसी उमेदवाराला आमच्या मागण्या मान्य असतील आणि त्याने बॉण्ड दिला तर आम्ही त्याला देखील पाठिंबा देऊन निवडून आणू असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
आम्ही काल बोलताना म्हटलो की सगळ्यांनी अर्ज भरून घ्या, पण सगळ्यांनी अर्ज भरू नका. दोन तीन उमेदवार निवडा आणि त्यांनी अर्ज भरा. ज्या दिवशी एकाच नाव डिक्लेअर होईल त्यावेळेस बाकीच्यांनी आपली उमेदवारी मागे घ्यायची आहे. जर उमेदवारी मागे घेतली नाही तर तो पैसे घेऊन आमच्याविरोधात उभा राहिला असं आम्ही समजू असेही यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले.