
जळगाव मिरर | १० जून २०२४
पत्नी शेतात गेलेली होती तर मुले असताना बाहेर खेळत दीपक सीताराम भालेराव (वय ३८, रा. पिलखेडा, ता. जळगाव) या तरुणाने घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना पिलखेडा येथे रविवार दि. ९ जून रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. नळाला पाणी आल्याने घरात भांडे घेण्यासाठी मुलगा गेला त्या वेळी त्याला वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसताच त्याने एकच आक्रोश केला.
सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील पिलखेडा येथील दीपक भालेराव व त्यांच्या पत्नीदेखील शेतीकाम करतात. पत्नी रविवारी सकाळी दीराणीसोबत शेतात गेलेल्या होत्या. तसेच त्यांची दोन्ही मुले घरासमोर खेळत होते. त्या वेळी घरात एकटेच असलेल्या दीपक यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. नळाला पाणी आल्याने त्यांचा मोठा मुलगा धीरज हा पाण्यासाठी घरात भांडे घेण्यासाठी गेला. त्या वेळी त्याला वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसले. तो तसाच धावत आला व त्याने आजूबाजूच्या नागरिकांना हा प्रकार सांगितले. शेजारील मंडळी व भावांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालायत नेले असता तेथे डॉक्टरांनी मयत घोषित केले. दीपक यांना दोन मुले असून मोठा मुलगा धीरज हा नुकताच दहावी उत्तीर्ण झाला. तर लहान मुलगा सिद्धार्थ हा इयत्ता नववीला आहे. मयताचे भाऊ व आई-वडीलही गावातच राहतात. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




















