
अमळनेर : प्रतिनिधी
तुझे लग्न जमू देणार नाही अशी धमकी दिल्याने मामाने आपली जीवनयात्रा संपविली आहे. या प्रकरणी फिर्याद भाच्याने अमळनेर पोलिसात दिल्याने रणाईचे येथील एकाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रणाईचे येथील प्रकाश भाऊसाहेब पाटील यांनी फिर्याद दिली की 21 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास सुनंदाबाई धनराज पाटील ही घरासमोरून जात असताना त्यांच्या मावशीत व तिच्यात शाब्दिक वाद झाला सायंकाळी पाच वाजता धनराज रघुनाथ पाटील घरासमोर येऊन शिवीगाळ करत होते. धनराज ने मावशी व आजोबांना मारहाण केली. भांडण सोडवायला गेलेल्या मामा विजय साहेबराव पाटील यालाही मारहाण करून तुझे लग्नच जमू देणार नाही, आणि लग्न कसे जमते तेच बघतो अशी धमकी दिली. यापूर्वीही त्याने मामाला तुझे लग्न जमू देणार नाही तू असाच मरून जाशील अशी धमकी दिली होती. याचे वाईट वाटून मामा विजय साहेबराव पाटील याने 23 रोजी सकाळी 12 वाजेपुर्वी सातरणे रस्त्याला शालीक गंगाराम पाटील यांच्या शेताच्या बांधावर चोलाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरून धनराज रघुनाथ पाटील यांच्या विरुद्ध मळनेर पोलीस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ करीत आहेत.




















