मुंबई : ठाण्यात उत्तर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे ची भोंगे काढण्याची अंतिम मुदत दिल्यानंतर ३ मे रोजीच औरंगाबादमध्ये जाहीर सभेचे आयोजन केले आहे. हि सभा कशासाठी हे मात्र अद्याप कुणालाही ठाऊक नाही पण त्यामध्ये हे मुद्दे असण्याची दाट शक्यता आहे. ‘हे जर बंद झालं नाही तर महाआरती करावी लागेल कधीकाळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना सोडलेलं हे फर्मान. आता तोच आदेश राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. येत्या 3 मे रोजी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मनसेच्या वतीनं राज्यभरात महाआरती केली जाणार आहे.
मनसे पदाधिकाऱ्यांच्या शिवतीर्थवर झालेल्या बैठकीत महाआरतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. नेमकी याचदिवशी ईद देखील आहे. मनसेचा महाआरतीचा कार्यक्रम म्हणजे राज ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेची पुढची पायरी मानली जातेय. हिंदूजननायक अशी आपली नवी प्रतिमा तयार करण्यासाठी त्यांनी तीन मोठे मास्टरप्लॅन जाहीर केलेत.
1 मे – महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. ज्या मैदानात बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं संभाजीनगर करण्याची मागणी पहिल्यांदा केली, त्याच मैदानात राज ठाकरेंची सभा होणार आहे.
3 मे – अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मनसेच्या वतीनं राज्यभरात महाआरती केली जाणार आहे. पोलिसांची परवानगी घेऊन महाआरती आणि हनुमान चालिसा पठण करण्यात येणार आहे.
