
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील रथ चौकातील रहिवासी घरातून कुणालाही न सांगता गेलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीला आली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही.
शहरातील रथ चौकातील रहिवासी घरातून कुणालाही न सांगता गेलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीला आली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील रथ चौकातील रहिवासी योगेश वाणी हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. ते सोनारी काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. दरम्यान, आज सकाळी नळ आले असल्याने त्यांनी घरी पाणी भरले. काही वेळानंतर ते कोणालाही काही न सांगता घरातून बाहेर पडले. यावेळी त्यांनी असोदा रेल्वेगेटजवळील अपलाईन वरील खांबा क्रमांक ४२२/६ ते ८ दरम्यान धावत्या रेल्वेखाली योगेश वाणी यांनी आत्महत्या करीत आपली जीवनयात्रा संपविली. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आणण्यात आला. जळगाव तालका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.