
औरंगाबाद : वृत्तसंस्था
संपूर्ण राज्यभराचे लक्ष लागून असलेल्या मनसेच्या राज सभेत राज ठाकरे हे ठीक रात्री ८ वा. सभेस्थळी पोहोचले. यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
त्यानंतर महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत सोबत इतिहासाचे दाखले देत. श्री ठाकरे हे शरद पवार यांच्यावर चांगलेच बरसले. तर सोबतच भोंग्या सदर्भात श्री ठाकरे यांनी ३ मे ही शेवटची मुदत असल्याचे सांगितले.
तर मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना ठाकरे यांनी सांगितले की, ४ मे पासून पोलीस परवानगी घेवून हनुमान चालीसा लावण्याचा कार्यक्रम घेण्याचेही आवाहन श्री ठाकरे यांनी केले.
सभेदरम्यान भोग्याचा आवाज आल्याने श्री ठाकरे चांगलेच संतापले यावेळी श्री.ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करून ते बंद करण्यास सांगितले जर त्यांना ही भाषा समजत नसेल तर महाराष्ट्रात जर काही झाले तर ते तुम्हालाच पहावे लागेल असेही ठाकरे बोलले.