जळगाव मिरर / २६ मार्च २०२३
जिल्ह्यात नियमित कुठेना कुठे अपघात होण्याची मालिका अजूनही संपत नाही आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर नशिराबाद गावाजवळ भरधाव ऑईल टँकरने दि २६ रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दोन तरुणाचा मृत्यू झाला असून, दोघेही मृत एमआयडीसीतील चटई कारखान्यात कामाला होते.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एमआयडीसीतील चटई कारखान्यात काम करणारे मजूर संदीप शिरसाम (वय २४), वसंत वरखेडे (वय २८) हे दोघी दुचाकीने अर्ध्या दिवसाची सुटी घेऊन ते भुसावळमार्गे गावाकडे निघाल्याचे सांगण्यात आले. तरुण संदीप मानसिंग शिरसाम आणि वसंत मुन्ना वरखेडे (दो. रा. धमण्या, जि. बैतूल, मध्यप्रदेश) दुचाकीने (एमपी ४८, एमआर ५३९७) भुसावळकडे जात होते. राष्ट्रीय महामार्गावर दोघे दुचाकीस्वार चुकीच्या दिशेने नशिराबाद पुलाच्या दिशेने निघाले होते. याच वेळेस भुसावळकडून जळगावच्या दिशने पुलावरून खाली उतरताना भरधाव वेगाने ऑईल टँकर (एमएच ०४, डीएस २२१७) चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारांना वाचविण्याचा अटोकाट प्रयत्न केला. मात्र, अपघात होऊन दोन्ही तरुण जागीच ठार झाले. अपघाताची माहिती कळताच नशिराबादचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, सहाय्यक फौजदार अलियार खान, अतुल महाजन, रूपेश साळवे घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावरील मृत तरुणाचे मृतदेह तातडीने खासगी गाडीतून जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले.