
जळगाव मिरर | ३ ऑगस्ट २०२३
जळगाव शहरातील अनेक प्रभागातील समस्येबाबत गेल्या आठवड्यात नगरसेवक डॉ.अश्विन सोनवणे यांनी मनपासमोर आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर शहरातील वेगवेगळ्या प्रभागातील नागरिक आपल्या समस्या घेऊन नगरसेवक डॉ.अश्विन सोनवणे यांच्याकडे येत प्रभागातील समस्यांचा पाढाच वाचत आहे. या समस्यांवर नगरसेवक डॉ.सोनवणे यांनी तातडीने मार्ग काढावा असे देखील यावेळी आग्रही मागणी नागरिकांनाकडून करण्यात येत आहे.
जळगाव शहरातील विविध प्रभागात सध्या असलेल्या रस्त्यांसह गटारीमुळे प्रभागातील अनेक रस्ते चिखलमय झाले आहे. त्यामुळे या समस्या नेहमीच जळगावकर जनतेला माहित आहे तरीसुद्धा जळगाव महानगरपालिकेतर्फे कुठलीही उपाययोजना होत नसल्याने अनेक नागरिक नगरसेवकांसह महापालिकेत तक्रारीचा पाऊस पाडत असतात, पण या तक्रारीमध्ये खूप कमी प्रमाणात तक्रारी सोडविण्यात येत असल्याने नागरिक हैराण झालेले आहे. पण सध्या गेल्या आठवड्यात याच समस्यांबाबत नगरसेवक डॉ.अश्विन सोनवणे यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांना घेऊन मनपा बाहेर आंदोलन केले होते. हे आंदोलन तीन ते चार दिवसांनी आमदार राजू मामा भोळे यांनी मध्यस्थी करीत सोडविले होते. हे आंदोलन संपताच जळगाव शहरातील नागरिकांच्या समस्या बाबत अनेक नागरिक डॉ.अश्विन सोनवणे यांच्याकडे येत आपल्या प्रभागातील समस्यांचा पाढा वाचवून दाखवत आहे. त्यामुळे जळगावकर नागरिकांना डॉ.अश्विन सोनवणे यांच्याकडून अनेक अपेक्षा असून त्या लवकरात लवकर सोडाव्या अशी देखील मागणी जोर धरू लागली आहे.





















