जळगाव मिरर | १२ ऑगस्ट २०२३
राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या सरकारने नुकताच राज्यातील जनतेला दिलासा देणारी बातमी दिली आहे. यामुळे अनेक गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवेचा मोठा फायदा देखील होणार आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या #वैद्यकीयसेवा येत्या १५ ऑगस्टपासून नि:शुल्क उपलब्ध हाेणार आहेत. मंत्री @TanajiSawant4MH यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना नि:शुल्क उपचार मिळणार आहेत. pic.twitter.com/vOy5LmABwH
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 12, 2023
गेल्या अनेक वर्षापासून राज्यातील गरजू जनतेला सरकारी रुग्णालयामध्ये उपचार घेणेदेखील परवडत नव्हते. त्यामुळे येणाऱ्या रुग्णांना प्रत्येक वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी नुकतीच दिली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा निशुल्क आता १५ ऑगस्ट पासून उपलब्ध होणार असून त्यामुळे राज्यातील जनतेला हा मोठा दिलासा असणार आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी गेल्या काही महिन्यापासून सातत्याने पाठपुरावा करीत व राज्यातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना निशुल्क उपचार मिळावे यासाठी त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश देखील आले आहे.
