
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेरचे ग्रामीण रुग्णालय फक्त ३० खाटांचे आहे. या ठिकाणी सर्प दंशाचा गंभीर रुग्ण उपचाराला आला तर त्याला उपचाराच्या आम्हाला वरुनच मर्यादा घालून दिलेल्या आड येतात. कारण आमच्याकडे व्हेन्टिलेटर आणि अतिदक्षता विभागाची सुविधा नाही. अशा रुग्णावर आम्ही प्रथमोपचार करुन तो रुग्ण अधिक उपचारार्थ धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवून देत असतो, असा खुलासा अमळनेर ग्रामीण रुग्णालयातर्फे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश ताळे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेवून खुलासा केला आहे.
तालुक्यातील डांगर बु।। येथील एक सर्पदंशाचा रुग्ण या रुग्णालयात आला. आधी त्याला वाटेत जानवे येथील जि.प. प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखविण्यात आले. तेथून त्याला अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. त्याच्यावर दोनही ठिकाणी आपापल्या परीने प्रथमोपचार करण्यात आले. धुळ्याला हलवित असतांना तो रुग्ण दगावला. याबाबत डॉ. ताळे यांनी खुलासा करीत सारवासारव केली.
ते म्हणाले आय सी यु ची सोय फक्त जिल्हा रुग्णालयातच असते. तेही ६ च खाटांचे ते कक्ष असते. ५० खाटांचच्या उपजिल्हा रुग्णालयातदेखील हे आय सी यु कक्ष नसते. त्याला अतिरिक्त यंत्रणा लागते. हा आय सी यु कक्ष आकृति बंधात ग्रामीण रुग्णालयाला मंजूर केलेला नाही. अशीही स्पष्टोक्ती डॉ.ताळे यांनी दिली. गेल्या ६ महिन्यांत अमळनेर ग्रामीण रुग्णालयात ६९ सर्पदंशाचे व २६ अज्ञात दंशाच्या रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. सर्प दंश लस दिवसातून २४ तास विनामुल्य उपलब्ध आहे. आवश्यकतेनुसार सर्व रुग्णांना दिली जाते; व ज्या रुग्णांना आय सी यु त दाखल करण्याची आवश्यकता असते.त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविले जाते. लस घेवूनही सर्वच रुग्ण बरे होतील, असे होत नाही.
सर्प दंशाचे बहुतेक रुग्ण बिनविषारी असतात, वर्षभरात विषारी सर्प दंशाचे सरासरी २ ते ३ रुग्ण मृत येत असतात व तेवढ्याच संख्येने सिरीयस स्थितीत सर्प दंशाचे दाखल होतात.सर्वच रुग्ण बरे व्हावे या उद्देशाने तात्काळ उपचार केले जातात. काही रुग्ण अशासकीय पद्धत वापरुन अथवा सर्पदंशाचा अंदाज न आल्याने उशिराने दाखल होतात. सर्व ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्पदंश उपचाराची सेम पद्धती वापरली जाते असेदेखील डॉक्टरांनी खुलासीत केले.
कोविड काळात व्हेंटिलेटर् उपलब्ध करण्यात आले होते परंतु त्यावेळेस कलेक्टर ऑफीसमार्फत अतिरिक्त डॉक्टर्स, सिस्टर्स, वॉर्डबॉय नियुक्त केलेले होते. त्या अतिरिक्त स्टाफला कार्यमुक्त केलेले आहे. असेदेखील डॉ. ताळेंनी सांगितले.
जनरल फिजिशियन, एम.डी. डॉ. संदीप जोशी यांनी पुष्टी दिली की, सर्प दंशा रुग्ण आला तर आधी त्याला खरोखर सर्पदंश झाला आहे की, दुसरा काही प्रकार आहे ते बघावे लागते आणि सर्प दंश झाला असल्यास त्याला कोणत्या जातीच्या सापाने दंश केला असावा? ते शोधतो.प्रत्येक रुग्णाला भिन्न भिन्न प्रकारच्या लसी द्याव्या लागतात. मनियार, कोब्रा अशा सर्पाने तेही मानेला दंश केला असेल तर तो रुग्ण जास्त करुन दगावतो. येथील नर्मदा मेडिकल फाऊंडेशनमध्ये सर्जन डॉ अनिल शिंदे हे उपचार करु शकतात परंतु ते तेवढेच जोखमीचे असते तथापि या रुग्णांचे प्रमाण नगण्य असते. डॉ.संदीप जोशी देखील या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय सेवा देत असतात. त्यांनी महाडचे विख्यात डॉ. हिंमतराव बावस्कर यांचा सर्प दंशावरचा उपचारांचा लेख यावेळी वाचून दाखविला. सदर पत्रकार परिषदेला अमळनेर ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ. सौ. प्रांजली पाटील यादेखील उपस्थित होत्या.





















