जळगाव मिरर । २६ सप्टेंबर २०२३
जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून जोरदार पाऊस सुरु असल्याने भुसावळ तालुक्यातील सुसरी येथील रहिवाशी असलेल्या शेत मजुर महिला विल्हाळे शिवारात शेती काम करीत असताना दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास विज पडून दोघ महिला ठार झाल्याची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील सुसरी गावातील शेतकरी तुकाराम शांताराम तळेले यांच्या विल्हाळे शिवारातील (गट न ५९८) शेतात शेतीच्या कामासाठी मिनाक्षी उर्फ मनिषा रविंद्र तळेले (३४), ममता विनोद पाटील (३३) हे मंगळवार दि २६ रोजी शेती काम करीत असताना दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास अचानक विजेचा कडकडाट होऊन दोघ महिलाच्या अंगावर पडल्याने त्या जागीच बेशुद्ध पडल्या. ही घटना शेजरच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या लक्षात येताच त्यांनी सुसरी गावात संपर्क साधुन बेशुद्ध अवस्थेत महिलाना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून मृत घोषित केले. मयत मिनाक्षी तळेले यांच्या यांच्या पश्च्यात पती, एक मुलगा एक मूलगी असा परिवार आहे, तर ममता पाटील यांच्या पश्च्यात पती मुलगा निलेश व रुद्रा असा परिवार आहे. या बाबत वरणगाव पोलीस स्टेशनला नितिन पुडलीक पाटील पो पाटील (सुसरी) यांच्या खबरी वरून अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे सुसरी गावात शोककळा पसरली असुन परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.