
जळगाव मिरर | २९ सप्टेंबर २०२३
गणेश चतुर्थीला गणरायांची उत्साहात स्थापना केल्या नंतर दहा दिवस चैतन्यमय आणि भक्तिमय वातावरणात गेल्यानंतर गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते. आणि नियमानुसार, प्रथेनुसार अनंत चतुर्दशीला श्री. गणेशाचे विसर्जन करण्याची प्रथा आहे.
दहा दिवसाचा पाहुणचार घेऊनअनंत चतुर्दशीला गणपती बाप्पा आपल्या गावी पुन्हा जात असतो. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात गणरायांचे विसर्जन करण्यात येते.
मुक्ताईनगर तालुक्यात स्थापना करण्यात आलेल्या गणरायांच्या मूर्तींचे खामखेडा येथील पुलावरुन पुर्णा नदी पात्रात आणि पिंप्रीनांदू येथील पुलावरुन तापी नदी पात्रात विसर्जन करण्यात येते. सध्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ हे मोठमोठ्या उंची असलेल्या आणि वजनाने जड असलेल्या गणेश मूर्तींची स्थापना करतात परंतु विसर्जनावेळी पुलावरुन विसर्जन करते वेळी अडचण निर्माण होते यात एखादेवेळी दुर्घटना घडण्याची संभावना निर्माण होते हि बाब लक्षात घेऊन दहा दिवस भक्तिभावाने पुजा केलेल्या मोठ मोठ्या उंची वजनदार गणेश मूर्तींचे पावित्र्य जपले जाऊन त्यांचे व्यवस्थीत विसर्जन व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे यांनी खामखेडा आणि पिंप्रीनांदू येथील पुलावर मूर्ती विसर्जनासाठी क्रेनची सुविधा उपलब्ध करून दिली होती या क्रेन द्वारे मुक्ताईनगर, व रावेर तालुक्यातील अनेक गणेश मंडळांनी खामखेडा व पिंप्रीनांदू पुलावरुन आपल्या मंडळाने स्थापना केलेल्या गणरायांच्या मुर्तींचे नदी पात्रात विसर्जन केले
दरम्यान ॲड .रोहिणी खडसे यांनी खामखेडा आणि पिंप्रीनांदू पुलावर भेट देऊन विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली
पुलावर उपस्थित असलेल्या गणेश भक्तांशी व मंडळाच्या पदाधिकाऱ्यां सोबत संवाद साधुन व सावधानता सतर्कता बाळगुन सुरक्षितरित्या गणपती बाप्पांचे विसर्जन करण्याचे आवाहन केले.विसर्जन कार्यक्रमात सहभागी होऊन श्री गणेशाचे पूजन करून आरती केली व सर्व गणेश भक्तांच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,सर्वांच्या जीवनात भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्य येवो.. पाऊसपाणी, पिकपाणी व्यवस्थित होऊन बळीराजाला सुगिचे दिवस येऊ दे अशी गणराया चरणी प्रार्थना केली ही गणरायाच्या चरणी प्रार्थना केली.
यावेळी माजी सभापती किशोर चौधरी, मुळाभाऊ पाटील, पवनराजे पाटील,बापू भाऊ ससाणे, बाळाभाऊ भालशंकर, राहुल युवराज पाटील,भैय्या पाटील, विजसिंह पाटील,विनोद काटे, संजय माळी, ॲड.राहुल पाटील, निलेश भालेराव, विजय शिरोळे,गणेश गवते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते





















