जळगाव मिरर | ८ ऑक्टोबर २०२३
रोहिणी खडसे यांनी भारतीय जनता पक्षाकडून मागील विधानसभा निवडणुक लढली त्यात अल्प मतांनी त्या पराभुत झाल्या परंतु पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून त्या पायाला भिंगरी लावुन जनसेवेत हजर झाल्या नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्या नंतर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटना बांधणी करण्यासाठी विविध उपक्रम राबविले त्यांनी सुरू केलेली जनसंवाद यात्रा राज्यभरात चर्चेचा विषय ठरली.
अनेक मोर्चे आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली त्यांचे कार्य बघून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करून त्यांना राज्य पातळीवर नेतृत्व करण्याची संधी दिली गेले चार वर्षा पासुन मतदारसंघात शेवटच्या घटकापर्यंत केलेला जनसंपर्क टिकवून राज्यात नेतृत्वाला अपेक्षित असलेले संघटन उभे करण्यात त्यांची खरी कसोटी लागणार असली तरी गेल्या एक महिन्याचा कार्यकाळ बघता त्या या कसोटीवर खरे उतरत असल्याचे दिसुन येते आहे. प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या नंतर त्या लगेच मतदार संघात शेतकऱ्याच्या बांधावर धावून आल्या बोदवड, कुऱ्हा परीसरात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले रोहिणी खडसे यांनी लागलीच नुकसानग्रस्त भागात शेती बांधावर पोहचून नुकसानीचे पंचनामे व खबरदारीच्या उपाययोजना करण्याबाबत प्रशासना सोबत संपर्क साधला. शेती पंपाला सुरळित विज पुरवठा होण्यासाठी शेतकऱ्या सोबत विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. गणपती उत्सवाच्या निमित्ताने गाव खेड्यातील गणेश मंडळ पर्यंत पोहचल्या मतदारसंघात प्रत्येकाच्या तोरण मरण दारी जाऊन सुख दुःखात सहभागी होण्याचा नेम त्या गेल्या पाच सहा वर्षांपासून पाळत आल्या आहेत.
यातून मोठी जबाबदारी मिळाली तरी मतदारसंघा सोबतची नाळ त्यांनी तुटू दिली नाही असे दिसून येते मुक्ताईनगर मतदारसंघात माझे घर राष्ट्रवादीचे घर हे अभियान राबविले शाळा बाह्य व शिक्षणापासून वंचित मुलांना शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी गणेश उत्सवात श्री गणेशा शिक्षणाचा अभियान राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने राज्यभरात राबविले त्याला उत्तम प्रतिसाद लाभला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा खा.सुप्रिया सुळे यांच्या सोबत नागपुर, वर्धा, अमरावती जिल्हा दौरा करून पक्ष संघटन बांधणी करण्या साठी नविन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या तसेच पक्ष पदाधिकारी मेळाव्यातून पक्षाची ध्येय धोरणे मांडली. सोलापूर, बिड जिल्हा दौरा करून महीला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले मुंबई येथील प्रदेश कार्यालयात पदाधिकाऱ्यांना वेळ देउन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यातून राज्य पातळीवर पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी त्यांनी कंबर कसल्याचे दिसुन येते . एक अर्थाने मतदारसंघ व राज्य पातळीवरील जबाबदारी दोन्ही पातळीवरील काम करताना ॲड. रोहिणी खडसे यांची कसोटी लागत असली तरी त्या कसोटीवर खऱ्या ठरत असल्याचे दिसून येत आहे