
जळगाव मिरर | २९ ऑगस्ट २०२५
यावल शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या महाराष्ट्र धाब्याच्या समोर अवजड साहित्याची वाहतूक करणाऱ्या कंटेनर आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या अॅपे रिक्षाचा अपघात झाला. यामध्ये नऊ जण जखमी झाले आहे. जखमी मध्ये ८ महिला असून या महिला ऋषिपंचमीनिमित्त तापी नदीवर स्नान करण्यासाठी गेल्या होत्या. अपघातत जखमी महिलांना मनसेचे चेतन अढळकर यांनी आपल्या खाजगी वाहनात टाकून रुग्णालयात दाखल केले. सर्व जखमी महिलांवर यावल ग्रामीण रुग्णालया उपचार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्यावर महाराष्ट्र ढाबा आहे. या ढाब्या समोरून गुरूवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास किनगाव येथील महिलांना ऋषीपंचमीनिमित्त तापी नदीत स्नान करून अॅपे रिक्षा (एम. एच. १९ बी. जे. ९९२३) द्वारे किनगावकडे परत जात होत्या.
दरम्यान यावल कडून भुसावळ कडे जाणाऱ्या अवजड साहित्य वाहतूक करणाऱ्या कंटेनर (आर. जे. ३२ जी.बी. ४२५६) या दोघांमध्ये अपघात घडला. या अपघातामध्ये रिक्षा चालक प्रल्हाद माणिक सावळे (रा. मालोद), बेबाबाई वासुदेव धनगर, नंदा संजय धांड, रत्ना गणेश धनगर, प्रतिभा भगवान धनगर, वैशाली संजय पाटील, सुरेखाबाई रतिलाल काटे धनगर, लताबाई कैलास कोळी, योगिता माधव धनगर (सर्व रा. किनगाव बुद्रुक ता. यावल) या जखमी झाल्या. दरम्यान अपघातानंतर या रस्त्यावरून जळगाव जात असतांना मनसेचे चेतन अढळकर, किशोर नन्नवरे यांनी जखमी महिलांना पाहून या सर्व जखमी महिलांना आपल्या खाजगी वाहनाव्दारे उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयात आणले.
रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे, अधिपरिचारीका मंजुषा कोळेकर, अमोल अडकमोल, संजय जेधे यांनी जखमींवर उपचार केले. दरम्यान, अपघाताची मिळतात घटनास्थळी यावल पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अमित तडवी, मंगेश पाटील, संतोष पाटील, परमेश्वर जाधव, दिवाकर जोशी हे दाखल झाले. या अपघात प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रकीया सुरू होती.




















