
जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहर महानगर पालिकेच्या जन्म – मृत्यू विभागात भोंगळ कारभार तसेच येथे असलेले जुनाट कागदपत्रांची कुठलीही देखभाल ठेवली जात नसल्याची तक्रार आम आदमी पार्टीतर्फे आयुक्त विद्या गायकवाड यांच्याकडे महागर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, जळगाव महानगर पालिकेच्या जन्म – मृत्यू विभागात नागरिकांना सतत जन्म किंवा मृत्यू दाखल्यासाठी फिरविले जाते तसेच येथे गेल्या कित्येक वर्षांपासून असलेल्या फाईली, गट्ठे हे तसेच पडून आहे. त्याकडे कुठलेही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचे लक्ष नाही तर जुने काही नागरिकांचे मुत्यू दाखल घेण्यासाठी नागरिक येतात. ज्या मयत व्यक्तीची पावती नातेवाईक घेवून येतात त्या पावतीचा नंबर दुसऱ्याच्याच नावाचा निघत आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना याचा मानसिक त्रास होत आहे. या सर्व बाबी बाबत आम आदमी पार्टीतर्फे आयुक्त विद्या गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.
आपचे महागर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर यांच्या नेतृत्वाखाली योगेश भोई, रत्नाकर खरोटे, अरिफ खान,दुर्गेश निंबाळकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवेदन दिले.






















