
पाचोरा : प्रतिनिधी
गेल्या दोन महिन्यांपासून राज्याचे राजकारण गुजरात ते गुवाहाटीमार्गे मुंबई येवून चालले त्यानंतर शिंदे गटाची व भाजपाची युती झाली. पण मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले देवेंद्र फडणवीस यांनी अचानक सुरु असलेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. त्यापासून ते थेट शिवेसेनेच्या चिन्हाबाबत न्यायालयात सुरु असलेली लढाई, संजय राऊत यांना ईडीकडून अटक तर पाचोऱ्यात भावा-बहिणींमध्ये सुरु झालेले राजकारण असा हा प्रवास राज्यात चांगलाच चर्चेचा विषय ठरला.

पाचोरा तालुक्याचे आ.किशोरआप्पा पाटील हे ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात सामिल झाले होते. ते ठाणे – सुरत – गुवाहाटी – मुंबई असा प्रवास आप्पांनी केला. त्यानंतर जिल्ह्यात आ.पाटील यांना मंत्रीपद मिळावे म्हणून कार्यकर्त्यांना नवसच केले होते. परंतु कॅबिनेट मंत्री मंडळाच्या विस्तारामध्ये आ.पाटील यांना संधी मिळाली नाही. पण पाचोरा तालुक्यात भाऊ-बहिणींचे नवीन राजकारण सुरु झाले. आ.पाटील यांच्या बहिण व स्व. आर.ओ. तात्या पाटील यांच्या कन्या यांनी तात्यांचा वारसा पुढे घेत ठाकरे गटाला पाठींबा देत शिवसेनेचे नेते आदीत्य ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी पाचोरा तालुक्यात केली होती. पण तो दौरा ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याने लांबणीवर पडला आहे. त्या अगोदर आज रक्षाबंधन हा सण आला.
पाचोरा तालुक्यातील जनतेच्या नजरा मात्र आ.पाटील व त्यांच्या बहिण वैशालीताई सुर्यवंशी यांच्याकडे होत्या की भावा-बहिणींच्या सणाला रक्षाबंधन होईल की नाही ? असा प्रश्न संबंध तालुक्यासह जिल्ह्यातील राजकारणात सुरु होता. पण त्याला वैशालीताई यांनी आ.किशोर पाटील यांच्या निवासस्थानी जावून आज दि.11 रोजी भाऊ व बहिणींचा पवित्र सण रक्षाबंधन साजरा केला. या भेटीनंतर तालुक्यासह जिल्ह्यात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी आ.पाटील यांनी आपल्या सोशल मिडीयावर ताईसोबतचा रक्षाबंधनाचा व्हीडीओ शेअर केल्याने राजकारणापेक्षा भाऊ बहिणींचे नाते अतूट असते हे नक्कीच म्हणावे लागेल.




















