
जळगाव :प्रतिनिधी
शहरातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेले व महिलांसाठी सदैव मदतीसाठी कटिबद्ध असलेले नारीशक्ती बहुद्देशीय संस्था व जायंट्स ग्रुप ऑफ तेजस्विनी यांच्या संयुक्त विद्यमानाने दि १२ रोजी सकाळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जळगावात ‘हर घर तिरंगा रॅली’ काढण्यात आली.
नारीशक्ती बहुद्देशीय संस्था व जायंट्स ग्रुप ऑफ तेजस्विनी यांच्या संयुक्त विद्यमानाने सकाळी ७:३० वाजता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या रॅलीमध्ये हर घर तिरंगा, वंदे मातरम, भारत माता की जय असे नारे देत जनजागृती करण्यासाठी सर्व पदाधिकारी सदस्य सहभागी झाल्या. हर घर तिरंगा, मन मन तिरंगा असे नारा देत ही रॅली हातात तिरंगा घेउन निघाली.
यांनी केले आयोजन
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी ही रॅली ओंकारेश्वर परिसरातून जनजागृती करत निघाली. याप्रसंगी अध्यक्षा मनिषा पाटील, नूतन खेडेकर, रेणुका हिंगु, कविता पाटील, आशा मौर्य, योगिता बाविस्कर, भाग्यश्री महाजन, उल्का पाटे, मनीषा ठाकूर, अनिता पाटील उपस्थित होते.




















