जळगाव मिरर | १२ ऑक्टोबर २०२३
देशभरात गेल्या वर्षभरापासून अनेकदा रेल्वेच्या अपघाताच्या घटना घडत असतांना आज पुन्हा एकदा दिल्लीहून बिहारमधील गुवाहाटीकडे जाणाऱ्या नॉर्थ-ईस्ट एक्स्प्रेस (12506) ला बुधवारी रात्री अपघात झाला. ट्रेनच्या सर्व 21 बोगी रुळावरून घसरल्या, त्यात दोन एसी-३ टायर बोगी उलटल्या. या अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून त्यात दोन पुरुष, एक महिला आणि एका मुलीचा ४ समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बक्सर-आरा दरम्यान रघुनाथपूर स्टेशनजवळ रात्री 9.35 वाजता हा अपघात झाला. ट्रेनमधील 100 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी 5 ते 20 जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पटना एम्समध्ये पाठवण्यात आले आहे. इतर जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रेल्वे गार्डने सांगितले की, ‘अपघाताच्या वेळी ट्रेन ताशी 120 किलोमीटर वेगाने धावत होती. अचानक ब्रेक लागला आणि ट्रेन रुळावरून घसरली. पोल क्रमांक 629/8 ला वक्र होता. येथून रेल्वेच्या चार बोगी निघाल्या. त्यानंतर एकामागून एक सर्व बोगी रुळावरून घसरू लागल्या. ही गाडी येण्याच्या अर्धा तास आधी या ट्रॅकवरून पॅसेंजर ट्रेन (03210) गेली होती. या घटनेनंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीमसह पाटणा, आराह आणि बक्सर येथील रेल्वेच्या बचाव पथकाने बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅकला तडा गेल्याने हा अपघात झाला आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.