जळगाव मिरर | ३० जून २०२५
भुसावळ तालुक्यातील बामणोद गावानजीक रविवारी संध्याकाळच्या सुमारास दुचाकी व एस.टी. बसच्या भीषण अपघातात दुचाकीस्वार मयूर श्रीराम गवळी (वय ३२, रा. इंद्रप्रस्थनगर, जळगाव) हा तरुण जागीच ठार, तर दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अपघातातील दोघे तरुण फैजपूर येथील रहिवासी आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, मयूर आणि जयेश सुधाकर पाटील (२९) आणि चिरिया मनोज गोहर (२९) है तिघे फैजपूरहून जळगावकडे मोटारसायकल (एम. एच. १९/ ई. एफ ७७०४) ने जात होते. दरम्यान, समोरून भरधाव वेगाने आलेल्या एस.टी. बस (एमा एच. १४/ एम. एच. १०८३) ने जोरदान धडक दिली. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. जखमींना तत्काळ भुसावळ येथील उपजिल्हा रुग्णालयातील ट्रॉमा सेंटर येथे हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय यांनी तपासणीअंती मयून श्रीराम गवळी यास मृत घोषित केले. इतन दोघे जयेश पाटील आणि चिरिया गोहन यांना गंभीर स्वरूपाच्या दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी जळगाव सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले.
