जळगाव मिरर | १५ नोव्हेबर २०२३
जळगाव शहरासह अनेक ग्रामीण भागात नेहमीच अल्पवयीन मुली व विवाहितेचा विनयभंग केल्याच्या अनेक घटना घडत असतांना आज पुन्हा एकदा अशीच एक घटना उघडकीस आली आहे. एका २८ वर्षीय तरुणीला तब्बल ७ दिवसापासून सतत फोन करून माझ्याशी लग्न कर म्हणत विनयभंग केल्याने रावेर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेली २८ वर्षीय तरुणीला दि.७ नोव्हेबर ते दि.१४ नोव्हेबर दरम्यान त्याच गावातील एक तरुण सतत फोन करून माझ्याशी लग्न कर नाही तर मी माझ्या जीवाचे बरेवाईट करून घेईल व तुला व तुझ्या घरच्यांना खोट्या गुन्ह्यात फसवेल अशी धमकी देखील या तरुणाने दिली तरुणीने लागलीच रावेर पोलिसात धाव घेत तरूणाविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.अर्जुन सोनवणे हे तपास करीत आहेत.