जळगाव मिरर | २६ जून २०२४
लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर अजित पवार गटातील आमदारांची घरवापसी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच अशी सरसकट घरवापसी होणार नाही, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
पक्षाला जिथे मदत होऊ शकेल, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढेल अशा सोडून गेलेल्या साथीदारांचे स्वागत करण्यात अडचण नाही. पण, ज्यांनी पक्षात अनेक पदे उपभोगली आणि पक्षाच्या नुकसानीसाठी पावले उचलली त्याबाबत पक्षातील सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल, त्यानंतर याबाबत निर्णय होऊ शकतो, असे पवार म्हणाले. पक्ष सोडताना आणि सोडल्यानंतर टीका करणाऱ्यांना शरद पवार गटाची दारे बंद असल्याचेच संकेत पवारांनी दिले. मुंबईतील पक्ष कार्यालयात मंगळवारी सूर्यकांता पाटील यांचा पक्ष प्रवेश झाला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी भूमिका स्पष्ट केली