जळगाव मिरर | १२ फेब्रुवारी २०२६
जळगाव शहरातील खोटेनगर ते गिरणा नदीच्या पुलापर्यंतचे राष्ट्रीय महामार्ग क्र.६ चे रस्त्याचे काम सुरु आहे,परंतु महामार्गावर एकाच बाजुचे काम प्रगतीपथावर असुन दुस-या बाजुकडुन मात्र जळगाव ते धुळे व धुळे ते जळगाव या मार्गावरील एकाच बाजुने वाहतुक सुरु आहे.यात अवजड वाहनांची संख्या मोठ्याप्रमाणात असल्यामुळे व रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. १० व १२ वी च्या परीक्षा सुरु असल्याने या परिसरातील परिक्षार्थी विद्यार्थ्यांची व पालकांची वाहतुक कोंडीमुळे दमछाक होत आहे….शाळेत व महाविद्यालयात जाणा-या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान देखील होत आहे.
दोन्ही बाजुंनी अवघड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होत असताना अनेक लहान वाहने रस्त्याच्या कडेला उलटली आहेत …लहानमोठ्या अपघाता़ंचे प्रमाण वाढलेले आहे. अतिगंभीर रुग्ण उपचारासाठी जळगाव कडे आणताना व जळगाव कडुन रुग्ण पुण्या मुंबई नेत असलेल्या रुग्णवाहिका या वाहतुक कोंडीत अडकल्याने रुग्ण देखील दगावण्याची शक्यता आहे..
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान,जिवितहानीची व अपघाताची शक्यता टाळण्यासाठी व रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी अवजड व इतर मोठी वाहने तरसोद बायपासमार्गे धुळेकडे व पाळधी बायपास मार्गे तरसोदकडे वळवावीत.यासाठी पाळधी व तरसोद याठिकाणी बॅरिकेटस लाऊन वाहतुक तरसोद मार्गे करण्यात यावी….हा पर्यायी मार्ग शासन व प्रशासनाने न केल्यास बहुजन मुक्ती पार्टी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.या विषयीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी जळगाव व नहींच्या मुख्य कार्यकारी अभियंता जळगाव यांना देण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व बहुजन मुक्ती पार्टीचे जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष सुनिल देहडे यांनी केले. निवेदन देतेवेळी सुमित्र अहिरे,देवानंद निकम,खुशाल सोनवणे,राहुल सोनवणे,दिलीप जाधव,डी.एम.भालेराव,रमेश थाटे,लंकापती भालेराव, रविंद्र मोरे,दिलीप तासखेडकर, पी.डी.सोनवणे,प्रभाकर मोरे, रविंद्र बाविस्कर,योगेश सोनवणे,गौरव सुरवाडे आदि बहुजन मुक्ती चे पदाधिकारी होते.




















