जळगाव मिरर | २१ ऑगस्ट २०२३
भाजप व शिंदे गटासोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील एका दिग्गज नेत्याने आज थेट शरद पवारांवर जोरदार टीका केल्याने राज्यातील राजकारण तापले आहे. या गटातील सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
ते म्हणाले कि, शरद पवार हे उत्तुंग नेते आहेत असं आपण म्हणतो. त्यांच्या आसपास फिरकणारा देशात एकही नेता नसल्याचं आपण म्हणतो. पण त्यांना राज्यात कधीच एकहाती सत्ता आणता आली नाही, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. दिलीप वळसे पाटील यांचा हा हल्ला शरद पवार गटाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत दिलीप वळसे पाटील यांच्यावर जोरदार टीका करतानाच वळसे पाटील यांच्या निष्ठेवरच बोट ठेवलं आहे.
तर यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिउत्तर दिले आहे ते म्हणाले कि, साहेबांचा सर्वात विश्वासू साथीदार, साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस, प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला. साहेबांच्या नजरेने या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही याचं आश्चर्य वाटते. साहेबांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा ही सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे. बाजूच्या मतदार संघात आमदार निवडून आणू शकले नाही. अन् शरद पवारांबद्दल बोलत आहेत,
