
जळगाव : प्रतिनिधी
शहराजवळ कांताई बंधाऱ्यावर दुपारी 2 मुली आणि 2 मूल बुडाले होते. यापैकी 2 तरुणी व 1 तरुणास पाण्यातून बाहेर काढण्यात यशस्वी झाले आहे. मात्र 1 तरुणास तब्बल 7 तास या तरुणाला शोधण्यासाठी महानगरपालिकेचे अग्नीशमन दलाचे पथक, पोलिस प्रशासनासोबत जैन इरिगेशनच्या पथकाने प्रयत्न केले परंतु रात्री उशिरापर्यंत या पथकाला यश आलेले नाही. आज सकाळी १ तास पाऊस सुरु असल्याने नदी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे येथील पोहणाऱ्यानाही पाण्याचा प्रवाह समजू शकत नसल्याने तो तरुण कुठल्या दिशेने वाहून गेला असेल हे मात्र रात्री उशिरापर्यंत कुणाला हि कळू शकलेले नाही. पोलिसांसह मनपा पथकाचे सातत्याने शोध मोहीम करत आहे.
काय आहे घटना
शहरातील दुध फेडरेशन परिसरातील मिथीला अपार्टमेंटमधील काही तरूण तरूणी गणेशोत्सव झाल्यानंतर आज सकाळी पिकनिकचा प्लॅन त्यांनी आखला सर्वांना आपआपल्या परिवाराची परवानगी घेवून त्यांनी कांताई बंधाऱ्यावर जाण्याचे ठरविले. कांताई बंधाऱ्यावर सकाळी 11 वाजेच्या सुमारास ते पोहचले. काही तरूणी फोटो काढत असतांना एकीचा पाय सटकला ती खाली पडताच तिला वाटविण्यासाठी दोन ते तीन मुलांनी पाण्यात उडी घेतली, यामध्ये काही तरूणांना बाहेर येता आले तर एक तरूणाला बाहेर येता आले नाही, त्यामध्ये पाऊस सुरु असल्याने पाण्याचा प्रवाह वाढत गेल्याने तरूण वाहून गेला. त्यानंतर या घटनेची परिवाराला माहिती मिळताच परिवारातील काही सदस्य घटनास्थळी दाखल होवून स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने तर मनपाच्या अग्निशमन विभागाच्या पथकाद्वारे व जैन इरिगेशनच्या टिमच्या माध्यमातून तरूणास नदीत शोधण्याचे कार्य तब्बल 7 तास सुरु होते. परंतु या पथकाला रात्री 8 वाजेपर्यंत यश मिळालेले नाही.
तालुका पोलिस पथक घटनास्थळी : पोलिस निरिक्षक रामकृष्ण कुंभार, पीएसआय नयन पाटील, पोना.कोळी, पोकॉ.भूषण सपकाळे, मिथुन पाटील, अनिल तायडे, विश्वनाथ गायकवाड, अशोक महाले यांच्यासह तालुका पोलिस स्थानकाचे पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मनपाच्या पथकात शरद सोनवणे, शशि बारी, गिरीश खडके, भुषण पाटील तर जैन इरिगेशनच्या पथकाचे मदत कार्यामध्ये रतिलाल सोनवणे, सागर भोई, प्रवीण वाणी यांनी कामगिरी बजावली.




















