जळगाव मिरर | १८ डिसेंबर २०२३
गेल्या काही वर्षापासून सोशल मीडियातून अनेकांचे प्रेम जुळत आहे तर काहीना याचा मोठा फटका देखील बसत आहे. मात्र राज्यात सध्या एक प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. इन्स्टाग्रामवरून अनोळखी मुलाशी ओळख झाली. चॅटिंगच्या माध्यमातून प्रेम जुळले. प्रेमासाठी तिने घरातून पलायन करत थेट परराज्य गाठले. पालकांनी कोतवाली पोलिसात फिर्याद दिली. शेवटी पोलिसांनी परराज्यातून शोधून मुलीला आई- वडिलांच्या हवाली केले. शहरात अशा दोन घटना घडल्या आहेत. एकीचा पोलिस शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ वर्षे पूर्ण झालेल्या दोन मुली इन्स्टाग्रामवर अनोळखी तरुणांशी झालेल्या ओळखीतून मुलांच्या प्रेमात पडल्या. मुलांसाठी त्या दोघीही घरातून निघून गेल्या. पालकांनी शोधाशोध केली. मात्र, सापडल्या नाहीत. त्यानंतर पालकांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्यादी दिल्या, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी एका मुलीला बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमारेषेवरून आणले व पालकांच्या हवाली केले. त्यानंतर दुसऱ्या मुलीच्या शोधासाठी पथक पाठविण्यात आले. ही मुलगी मराठवाड्यात असल्याची माहिती तपासातून समोर आली.