
जळगाव मिरर | ९ जून २०२५
अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे ठेकेदाराच्या भावाचा अमानुषपणे मारहाण करून खून करून पसार झालेल्या पाचही आरोपिंना अमळनेर पोलिसांनी मध्य प्रदेशातील दुर्गम डोंगर भागातून शिताफीने अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पातोंडा येथे विजेच्या तारा ओढण्यासाठी मजुरांची मध्य प्रदेशातून ने आण करणाऱ्या कैलास शामसिंग प्रजापती याला २९ रोजी मजुरांनी त्यांचे कामाचे पैसे देत नव्हता आणि दुसरे कामगार कामावर आणले म्हणून लोखंडी पाईप, लोखंडी पहारने हातावर, पायांवर, तोंडावर अमानुषपणे मारहाण केली होती. कैलास रात्रभर विका सोसायटी कार्यालयात बेशुद्ध पडून होता. सकाळी त्याला उपचारासाठी अमळनेर हुन धुळे व नंतर इंदोरला दवाखाण्यात दाखल केले होते. मारहाण करणारे आरोपी फरार झाले होते. उपचारादरम्यान कैलासचा मृत्यू झाला होता.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवून पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, हेडकॉन्स्टेबल विजय भोई, पोलीस राहुल गोकुळ पाटील व राहुल नारायण पाटील यांना आरोपीना शोधायला पाठवले. आरोपी मध्य प्रदेशातील दुर्गम डोंगर भागात वेगवेगळ्या ठिकाणी पळून गेले होते. पोलीस पथकाने मोबाईल सेलचे गौरव पाटील आणि मिलिंद जाधव यांचे तांत्रिक सहाय्य घेत गोपाल साहुलाल धुर्वे (वय ३५), पंकज उमरावसिंग शिलु (वय २७), सलीम निर्मलशहा धुर्वे (वय २२), रोहित बुद्धसिंग शिलु (वय १९) आणि शिवम फुलसिंग शिलु (वय १८, सर्व रा. बीजाधाना पो. ईटावा ता तामिया जि छिंदवाडा मध्य प्रदेश) यांना मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने सुमारे १०० ते १५० किमी परिसरातून विविध डोंगर दऱ्यातून अटक केली आहे.