
जळगाव मिरर । १६ जानेवारी २०२३ ।
झेप प्रतिष्ठान व इनफ्लक्स ॲग्रोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रिय शेती काळाची गरज हे अभियान जळगाव जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे. वेगवेगळ्या गावांमध्ये पथ नाट्य व पोस्टर प्रदर्शन,जन जागृती रॅली, यासोबत प्रत्येक तालुक्यात शेतकरी मेळावे तसेच शेतकरी बैठकीत कमी खर्चात जास्त उत्पादन कसे मिळवता येईल याबाबत तज्ञ लोकांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येईल.
तसेच खरीप व रब्बी हंगामातील पिकासाठी कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या शेतकऱ्यांचा पारितोषिक व सम्मान चिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याचे झेप प्रतिष्ठान चे सचिव अविनाश पाटील यांनी जाहीर केले आहे.




















