चोपडा : निखिल पाटील
महाराष्ट्र शासनामार्फत सुरू करण्यात आलेली ई पिक पाणी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ग्रामीण भागात नेटवर्कची फार मोठी समस्या आहे. व काही शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही आहेत. व काही शेतकऱ्यांना अँड्रॉइड मोबाइल मध्ये ती प्रोसेस करण्यात खूप अडचण येते. व शेतकऱ्यांना आपला पीक पेरा कसा लावावा हे शेतकऱ्यांसाठी आव्हान ठरत आहे. शेती माझी ,सातबारा माझा पिकपेरा या घोषवाक्य खाली सुरू करण्यात आलेल्या या योजनेला बऱ्याच अडचणी असल्यामुळे शेतकऱ्यांकडून अल्पसा प्रतिसाद मिळत आहे.
ई पीक पाहणी करत असताना शेतकऱ्याला स्वतः शेतात जाऊन तथा पिकाचा फोटो तसेच लोकेशन अपलोड करावे लागते. तसेच बरेच शेतकरी एकाच वेळेत ॲपचा वापर करत असल्यामुळे सर्वर लोड घेऊन ॲप चालत नाही. अशा बऱ्याच कारणांमुळे शासनाची योजना फोल ठरत आहे. व शेवटची तारीख 15 सप्टेंबर होती. तरी तारीख चालली गेली असून बरेच शेतकरी या पिक पाणी पासून वंचित आहे. शासनाकडे सातबारा वरील माहिती भरण्यासाठी महसूल व कृषी विभागाच्या अस्तित्वात यंत्रणा असताना शेतकऱ्यावर या प्रयोगाची सक्ती करणे हे चुकीचे आहे. यामुळे शासनाने या प्रयोगाची सक्ती न करता पूर्वीप्रमाणे शासकीय यंत्रणामार्फत पिक पेरा व इतर नोंदी घ्याव्यात असे निवेदन चोपडा तहसिल कार्यालयात शिंपी यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जळगाव जिल्हा सरचिटणीस उर्वेश साळुंखे यांनी निवेदन दिले.
