
जळगाव मिरर | ३० मार्च २०२६
दहशत पसरविणाऱ्यासाठी गावठी कट्टे घेऊन फिरणाऱ्या चौघांवर जिल्हापेठ व एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. त्यातील दोन जणांना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून दोन कट्टे, ८ जिवंत काडतूस, दोन दुचाकी व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथे राहणारा अक्षय आनंदा सैंदाणे (वय २९) हा काही दिवसांपुर्वी जळगावत राहणाऱ्या नातेवाईकांकडे आला होता. त्याने मध्यप्रदेशातून गावठी कट्टा खरेदी केला आणि तो दि. २८ मार्च रोजी शासकीय आयटीआयच्या मागे कट्टा घेऊन दुचाकीने रेल्वे स्टेशन येथे जात होता. मात्र त्यापुर्वीच जिल्हापेठ पोलिसांनी त्याच्या मुसक्या अवळल्या. त्याची कसून चौकशी केली असता, त्याच्याकडे एक गावठी कट्टा, पाच जिवंत काडतूस व दुचाकी जप्त केली. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आले.
तालुक्यातील कुसुंबा शिवारात दीपक ठकुबा गुंजाळ (वय २८), विठ्ठल रंगनाथ सोनवणे (वय २५, दोघ रा. सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर) व अजय बिरजू गारुंगे (रा. कंजरवाडा) हे गावठी कट्टा घेऊन फिरत होते. त्या वेळी एमआयडीसी पोलिसांनी त्यांच्याकडून गावठी कट्टा, तीन जिवंत काडतूस, दुचाकी व मोबाईल हस्तगत केले. यातील दीपक गुंजाळ याला अटक करण्यात आली आहे.





















